श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 14

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 14
बंदोबस्तात खजिना वाड्यात आला. मोहरांची, सोनेनाण्यांची मोजदाद झाली. दादोजींना जेव्हा हे समजले, तेव्हा ते राजांना म्हणाले,

‘बरं झालं. अडचणीच्या वेळी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली. देवानं देणं दिलं आहे. तो खर्च करायला तुम्ही मुखत्यार आहात. पण सारे अंदाज बांधून कामं उभी करा.”

दादोजींच्या एवढ्या मान्यतेवरही राजे खूश होते. तिन्ही गडांची कामे सुरू झाली. राजांनी त्याच द्रव्यातून शस्त्रे खरीदली, बंदुका घेतल्या. देवीगडाच्या सुवेळामाचीचे काम रूप घेऊ लागले. राजांचे पाय आता पुण्यात टिकत नव्हते. या तिन्ही गडांवर त्यांच्या खेपा होत होत्या.

राजे शिवापूरच्या वाड्यात असताना त्यांना तातडीचे बोलावणे आले. दादाजी व त्यांचे वडील नरसीबाबा वाड्यात आले होते. सदरेवर बाबाजी, दादाजी व दादोजी अधोवदन बसले होते. राजे तिघांना घेऊन आतल्या महालात आले. जिजाबाई म्हणाल्या, ‘बाबाजी घाबरून गेले आहेत. त्यांना काहीच सुचत नाही.’ ‘एवढं घाबरण्यासारखं काय आहे? एक खलिता आला, म्हणून एवढं घाबरायचं?’

राजे म्हणाले. दादोजींनी विजापूरकरांचे पत्र समोर टाकले. ते म्हणाले,

‘राजे, साऱ्याच गोष्टी लहान समजून चालत नाहीत. वाचा तो खलिता, म्हणजे आम्ही काळजीत का पडलो, ते समजेल.’

राजांनी खलिता उघडला. नजर फिरू लागली. दादोजी म्हणाले, ‘मोठ्यानं वाचा ना! मासाहेबांनाही मजकूर कळेल.’ ‘ठीक आहे’ म्हणत राजे वाचू लागले

‘वजारतमाब सिवाजीराजे फरजंद शहाजीराजे याणे शहासी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिडेश्वराचे डोंगराचे आश्रयाने पुंडावेयाने

मावळे वगैरे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशजी किल्ल्यावरील

ठाणे उठवून आपण किल्ल्यात शिरला…

हे न जालियास खुदावंत शहा तुजला विजापुरी नेऊन गरदन मारतील व जमेदारी हककानू चालणार नाही. हे मनी समजणे आणि याऊपरी दिवाणात रुजू राहणे…’

राजांनी पत्र वाचून संपविले; आणि ते बाबाजींना म्हणाले, ‘बाबाजी, एकंदरीत तुमची धडगत दिसत नाही. गर्दन मारली जाणार, असं दिसतं.’ बाबाजी म्हणाले, ‘राजे, शाही फर्मान म्हणजे काय थट्टा वाटते? उद्या घरादारांवरून गाढवाचे नांगर…….

‘बाबाजी! जसा दादाजी, तसा मी! गाढवाचे नांगर फिरतील, तर तेव्हा आम्ही असणार नाही. आम्हीही रोहिडेश्वरी शपथेत गुंतलो आहोत. त्यात आम्ही अंतर आणणार नाही.’

बाबाजी म्हणाले, ‘मी म्हातारा! आता माझे किती दिवस राहिले? पण तुमच्यासारखी मुल… काळजी वाटते, ती तुमची!”

यांच

पुरवणारा “तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली? हिंदवी स्वराज्याचे मनोरथ प तो समर्थ आहे. हे राज्य व्हावे, हे श्रींच्या मनात फार आहे. त्यावर आमची निष्ठा आहे.”

‘राजे, तुमची निष्ठा काय कामाची? आदिलशाहीशी टक्कर ही काय सामान्य

गोष्ट आहे? नुकतं मिसरूड फुटू लागलंय तुम्हांला. हे केस राजकारणात पांढरे झाले.’ “आमचं वय फार वेळा ऐकतोय ते! बाबाजी, श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेले, तेव्हा कृष्णाचं वय काय होतं? राम यज्ञरक्षणासाठी गेले, तेव्हा त्यांचं वय काय होतं? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा त्यांचं वय काय होतं? ‘ “राजे ह्या देवादिकांच्या गोष्टी! त्या सामान्य माणसाला….’

कोण सामान्य मानव? सामान्य समजणं हे चूक आहे. देवांचं राज्य उभं करायला आपण ठाकलो. त्या राज्यात देवांचंच अनुकरण केलं पाहिजे. दीन, दुबळे, हीन समजून राहणाऱ्यांच्या हातून हे कार्य कसं घडेल ?”

बाबाजी म्हणाले, ‘राजे, मी काय करू ?”

राजे म्हणाले, ‘मी कोण सांगणार? तुमच्यावर का सक्ती आहे? हे पटत नसेल, तर माफी मागून मोकळे व्हा!” बाबाजी थरथरत म्हणाले, ‘माफी? जिवासाठी?- राजे, हेही मावळचंच हाड

आहे. तुमच्या बरोबर आमचं व्हायचं ते होऊ द्या!’

दादाजी अभिमानाने आपल्या वडिलांच्याकडे पाहत होते. दादोजींना निःश्वास

सोडला. ते म्हणाले,

‘हे असं होणार, हे माहीतच होतं. बाबाजी, मला वाटलं होतं, तू राजांना

सांगशील. सारं शिकवलेलं वाया गेलं.’ ‘पंत, असं कसं म्हणता? राजांचं काय खोटं आहे? राजांच्या मागे देव उभा आहे. मीच म्हणतो, असं नाही, सारे म्हणतात! करतील, त्यात त्यांना यश आहे. खजिना सापडला, तो काय अवकाशातून पडला?’

‘बस्स कर, बाबा! एकटे राजे ऐकवतात, तेवढं पुष्कळ झालं. त्यात तुझी भर घालू नको.’ दादोजी म्हणाले. ‘दादोजी, तुम्ही चिंता करू नका. आम्ही आमच्या पेशव्यांच्या मार्फत विजापूर

दरबारला थैली रवाना केली आहे.’

‘काय म्हणून केलीत?’ घाबरून दादोजींनी विचारले. ‘दादोजी, आपल्या संगतीत राहून तेवढंही कळत नाही होय?- ‘इथले गड •गाफील आहेत. मुलुखात अंदाधुंदी आहे. बादशाहीनं जो मुलूख जहागिरीचा दिला आहे, त्याचा बंदोबस्त करणं कठीण आहे. त्यासाठी हे गड घेऊन मुलुखाचा
• बंदोबस्त केला आहे. शाही नोकरीत बेइमान होणार नाही…’ अशा मजकुराचं पत्र • आम्ही पाठविलं आहे. तेवढ्यावर बादशहा समाधान मानून घेईल.” ‘कुठवर?’ दादोजींनी विचारले.

“जमेल तिथवर!’ राजे म्हणाले. ” आणि महाराजसाहेबांना कळलं, तरी ?”

‘ते कळायचं राहिलंय थोडंच? तुम्हीच ते कळवलंत ना! आबासाहेबांचं अजून उत्तर आलं नाही. एवढी महत्त्वाची बाब. आबासाहेबांच्या मनात विकल्प आला असता, तर त्यांनी पत्र पाठविलं असतं. पत्र नाही, याचा अर्थ अनुज्ञा, असाच आम्ही घेतो.’

‘तुम्ही हवा तो अर्थ घ्यायला मोकळे आहात; पण पत्र नाही, याचा अर्थ आम्ही निराळा करतो.’ दादोजी म्हणाले. ‘कसला अर्थ?’ ‘आपल्या कारवाईमुळं, शाही फर्मानामुळं राजे संकटात तर पडले नसतील ना,

अशी भीती आमच्या मनाला ग्रासते…’ ‘ती भीती काढून टाका. आमचं पत्र गेलं, तेव्हाच तो विचार आम्ही केला होता. राजे बंगळुरी सुखरूप आहेत, विजापुरात ते नाहीत, ही बातमी आम्ही आणलेली आहे.’

आतापर्यंत शांत बसलेल्या दादोजींनी विचारले, ‘पण, राजे, बाबाजींनी राहायचं कुठं?”

‘का?’

‘आता अमीन थोडाच गप्प बसणार? केव्हा कैद होईल, ते सांगता येत नाही.’ ‘बाबाजींना ही भीती वाटत असली, तर हे घर कुणाचं आहे? निर्धोकपणे बाबाजी इथं राहतील. तुमच्याइतकाच त्यांचाही आमच्यावर हक्क आहे. आशीर्वाद द्यायला आणखीन एक वडीलधारं माणूस मिळालं, याचा आम्हांला आनंद आहे.’

राजे अचानक आल्याचे कळताच जिजाबाईंना आश्चर्य वाटले. रोहिडेश्वर घेतल्यापासून राजांचा मुक्काम सारखा शिवापूरला असायचा. मधून मधून ते यायचे, भेटायचे आणि परत जायचे. राजे आणखीन काही दिवस येणार नाहीत, असा मासाहेबांचा समज होता. मध्येच राजे आल्यामुळे त्यांचे मन चिंताचूर झाले. शिवाजीराजे येताच ते जिजाबाईंना घेऊन एकांती बसले. राजे चिंताग्रस्त होते. ते म्हणाले,

‘मासाहेब, परकीयांच्या आधी स्वकीयांनाच विरोध करावा लागणार, .’ असं दिसतं.
“कोण स्वकीय ?”

‘आमचे खुद्द मामासाहेब!’

‘कोण, मुधोजीराव?’ जिजाबाई उद्गारल्या.

“हो! आम्ही रोहिडेश्वरी केलेली स्वराज्यसंस्थापना त्यांना टोचली. आदिलशाहीदे इमानी सेवक ना ? त्यांनी मावळात फिरून चिथावणी द्यायला सुरुवात केली आहे. आमच्या विरुद्ध तेच शत्रू म्हणून उभे राहताहेत.’ “मग?’

येईल!”

‘आम्ही दुसरं काय करू शकतो? फलटणला स्वार पाठविले आहेत. आम्ह

तिकडे निघालो आहोत. भोसले काय असतात, हे त्यांनाही कळून

जिजाबाई उभ्या राहिल्या. कापऱ्या आवाजात त्या म्हणाल्या, ‘शिवबा! हात जोडते. पण हे सामोपचारानं घे. डोक्यात राख घालून घेऊ नको. भोसले-जाधवांचं वैर पेटले दोन्ही घराणी वारेमोल झाली. नाती जोडली, ती आधारासाठी; वैरासाठी नव्हे, ‘आम्ही कुठं वैर केलं? आगळीक त्यांनी केलेली आहे.’

“ती सुधारता येत नाही, असं थोडंच आहे? वैर वाढवायला साऱ्यांनाच येतं पण वैर टिकविण्याची ताकद फार थोड्यांना असते. त्यालाही असामान्य ताकद लागते.’

‘आम्ही घरी बसावं? होईल ते पाहावं?’ राजांनी विचारले. ‘मुळीच नाही. पण वैर मिटवायला जाता आहात, एवढं ध्यानी घ्यावं. ते वश

घेऊन तुम्ही परत यावं. मुधोजीराव सईचे वडील आहेत, हे विसरू नये, एवढंच

वाटतं.’

‘आपल्या आज्ञेबाहेर आम्ही नाही. आम्ही शिकस्त करू. येतो.’ राजांनी मासाहेबांचे पाय शिवले, आणि ते शिबंदीसह फलटणच्या मार्गाला लागले.

फलटणच्या वेशीत राजे पोहोचले. वेशीवर राजांचे स्वार होते. सारे गाव शांत होते. राजांचे घोडदळ कुठेच दिसत नव्हते. राजांनी विचारले, ‘सगळे कुठं आहेत?’

‘गावाची नाकेबंदी केली आहे.’ स्वार मुजरा करीत म्हणाला, ‘वाड्याबाहेर चौक्या बसवल्या आहेत.’

‘आणि निंबाळकर ?’

‘चाहूल लागताच ते पळून गेले. त्यांच्यापाठोपाठ घोडदळ गेलं आहे.’ ‘ठीक आहे.’ राजांनी नजर वर टाकली. माळावर लिंबाची झाडे होती. तिकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, ‘आम्ही इथं थांबतो. तू गावात जा. वाड्यावरच्या चौक्या उठव आणि त्यांना इकडे पाठव, एक सांगितलं, तर दुसरं करतात.” स्वार गेला. थोड्या वेळाने सारे चौकीदार लिंबाच्या दिशेने येताना दिसले. हवेत उकाडा होता. उष्ण वारे वाहत होते. त्या उन्हाच्या तावात फलटण मुरून बसले होते. गावची कूस वेडीवाकडी वळणे घेत गावाभोवती फेर धरून उभी होती. गावाच्या दरवाज्यातून येणाऱ्या स्त्रिया दिसताच शिवाजीराजे सावरून उभे राहिले. दृष्टिटण्यात तो जथा आला आणि शिवाजीराजांनी त्यांना ओळखले. पायांतली मोजडी काढून त्या तापल्या धुळीतून राजे सामोरे गेले. जवळ जाऊन

त्यांनी मुजरा

केला.

‘मुजरा, मामीसाहेब!’

निंबाळकर मामीसाहेबांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. राजे हात बांधून उभे होते. ते म्हणाले,

‘सावलीत चलावं.’

सावलीत जाताच राजे म्हणाले, ‘आपण उगीच उन्हातून येण्याचा त्रास घेतलात. आज्ञा करायची होती; आम्ही आलो असतो.’

‘कुंकवालाच हात घातलात, राजे! आज्ञा कोण करणार?” ‘गैरसमज होतोय, मामीसाहेब! जशा मासाहेब, तशा आपण. आमच्याकडून

कुणाला धक्का लागणार नाही.’

‘खरं? मग चौक्या का बसल्या? इकडून का जाणं झालं?’ ‘आपलं दुर्दैव! आम्ही मामासाहेबांची समजूत काढायला आलो; आणि मामासाहेब आम्ही चाल करून आलो, असं समजून पळून गेले. आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत.’

‘वाड्यात चलावं ना!”

‘जरूर येऊ! पण आता नाही. मालक नसता वाड्यात आलो, तर बळजबरीनं वाड्यात घुसलो, असा अर्थ होईल. आम्ही त्याचसाठी इथं थांबलो. मामासाहेब आले, की त्यांच्याबरोबर आम्ही येऊ.’

निंबाळकर मामीसाहेब समाधानाने परतल्या.

राजांना फार वेळ वाट पाहावी लागली नाही. उडणाऱ्या धुळीने घोडदळ येत असल्याचे सूचित केले. अश्वपथकाच्या समोरच दोन घोडी होती. एकावर मुधोजीराव होते. लगतच्या घोड्यावर येसाजी होता. थोड्या अंतरावर घोडी थांबली. मुधोजीराव सामोरे येत होते. नजीक येताच राजांनी मुजरा केला. मुधोजीराव संतप्त होते. येसाजीला राजांनी विचारले,

‘मामासाहेब कुठं मिळाले?’

‘तीन कोसांवर!’
‘हातपाई झाली?’

‘जी, नाही. चारी बाजूंनी घेरलं. आपसूक मिळाले.’ ‘मामासाहेब, एवढ्या तातडीनं कुठे निघाला होता?’

‘विजापूरला दुसरं कुठे जाणार?’

होतं.

‘आमच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी विजापूरला जाण्यापेक्षा पुण अधिक जवळ

‘जवळ असेल पण जवळची माणसं हवीत ना ?’

“मामासाहेब’ राजांचा आवाज किंचित चढला. ‘भावनेच्या भरात माणसांचा उपमर्द करू नका, आमच्यापेक्षा विजापूर जवळ? विसरलात वाटतं, मामासाहेब? • त्याच विजापूरकरांच्या कृपेनं दहा वर्ष सातारच्या तुरुंगात पडला होता. महाराजसाहेबांच्यामुळे आपण सुटलात. गेलेली जहागीर पूर्ववत मिळाली. मासाहेब

वाड्यात आहेत. खुद्द तुमच्या कन्या तिथं आहेत. ही सारी परकी?’ “तुमच्या बंडाव्याची झळ आम्हांला लागल्याखेरीज राहील का? राजे, हाल सोसून थकलो आम्ही!’

“आणि म्हणून हा मार्ग पत्करलात? मराठ्यांच्या नशिबी लिहिलेला हा शाप कधीच पुसून जाणार नाही का? जाधवांनी भोसल्यांशी वैर केलं. दोघे एक झाले असते, तर ? मामासाहेब, तुम्ही आशीर्वाद द्यायचा. ते सोडून तुम्हीच आमच्यावर उठलात! केव्हाही, कुणाही निरपराध्याला दहा वर्ष तुरुंगात पिचत पडावं लागू नये, म्हणून, ही मोगलाई जावी, म्हणून, आम्ही कमरा कसल्या…”

‘राजे, आशीर्वादाची गरज होती ना? रोहिडेश्वर घेताना कुठं आठवण झाली नाही? एका शब्दानं विचारलं नाही. आम्ही कोण, असं वाटलं ना?’ ‘हा मराठ्यांचा दुसरा गुण! ज्यानं अकारण हातबेडी ठोकली, त्याचे पाय चाटायला

जायला केव्हाही लाज वाटत नाही, पण क्षुल्लक मानापमानावरून गैरसमज! आयुष्याचं वैर। मामासाहेब, रोहिडेश्वराचा मनसुबा जसा तुम्हांला ठाऊक नव्हता, तसाच तो मासाहेबांना, दादोजींना पण माहीत नव्हता. हाती यश घेतल्याखेरीज सांगणार काय?’ मुधोजीरावांची नजर खाली वळली होती. राजे भरल्या कंठाने म्हणाले,

“मामासाहेब आम्ही तुम्हांला कैद केलेलं नाही. तुम्हांला शाही इतराजीचं भय वाटत असेल, तर तुम्ही आम्हांला येऊन मिळावं, असं आम्ही म्हणत नाही. तुम्ही वेगळे राहा; पण आमच्या कार्यात आड तरी येऊ नका! एवढीच विनंती करायला मी आलो आहे.’

मुधोजीराव शरमिंदे झाले होते. ‘राजे, आणखीन बोलून लाजवू नका. लहान वयात जो पोक्तपणा तुमच्या ठायी आहे, तो आमच्याजवळ नाही, याची आम्हांला खंत वाटते. मी वचन देतो… आपल्या कार्यात मी आड येणार नाही.

राजे हसले. म्हणाले, ‘आम्ही हाच आशीर्वाद समजतो.’

मुधोजीराव राजांच्यासह वाड्यात गेले. बजाजी राजांना येऊन भेटला. राजे म्हणाले, ‘बजाजी, तुम्ही आमचे मेव्हणे. कान पिळायचा अधिकार तुमचा, तुम्ही तरी मामासाहेबांना सांगायचं होतंत की, राजांचे कान मी पिळून येतो, म्हणून।’ त्या वाक्याबरोबर वाड्याचा ताण एकदम कमी झाला.

शिवाजीराजे म्हणाले, ‘संध्याकाळ होत आली. आम्ही निघतो.”

‘छे! राजे, रात्री कुठं जाणार? सकाळी जा. नाही तर आम्ही असे समजू की,

आपला राग गेला नाही.” ‘मामासाहेब! मासाहेब वाटेकडे डोळे लावून बसल्या असतील. त्यांच्या घशाखाली घास उतरला नसेल. उलट, आपण बरोबर आलात, तर फार बरं होईल. मासाहेबांना आपल्या…’ राजे चाचरले, आमच्या सांगण्याचा विश्वास बसायचा नाही.’

‘खरं आहे. मी येतो.’ मुधोजीराव म्हणाले. निंबाळकर मामीसाहेब दाराशी येऊन म्हणाल्या,

“राजे, त्यांना घेऊन जाणार ?’

राजे हसले. ते म्हणाले, ‘मामीसाहेब, काळजी करू नका. दगाफटका व्हायचा असता, तर इथंच घडला असता. मामासाहेबांना नेतो आहे, ते आशीर्वादासाठी!’

मध्यरात्रीच्या सुमारास राजांनी पुण्यात प्रवेश केला. दादोजी सदरेत बसून होते. पलोते जवळ होते. राजांनी चौकात प्रवेश केला; आणि मासाहेब बाहेर आलेल्या दिसल्या. राजांच्याबरोबर मुधोजीराव दिसताच जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मुधोजीरावांना राजे म्हणाले,

‘मामासाहेब, सांगितलं, ते खरं ना! पाहिलंत? मासाहेब वाटेकडे डोळे लावून

बसल्या होत्या.’

मुधोजीराव काही बोलले नाहीत. ते वर गेले; आणि त्यांनी मासाहेबांचे पाय शिवले. मासाहेब मागे सरत म्हणाल्या,

‘हे काय, मामासाहेब? आपण मोठेऽ’

‘फार लहान आहे मी, राणीसाहेब. त्याची तीव्रतेनं जाणीव झाली. राजे लहान, म्हणून त्यांचे पाय शिवले नाहीत. दुबळ्या मनावर मात झाली नाही.’

सईबाई धावत आल्या. बापाला पाहताच त्या धावल्या; आणि त्यांनी मुधोजीरावांना मिठी मारली. मासाहेब म्हणाल्या, ‘रडून गोंधळ केला पोरीनं. समजूत काढता काढता पुरे झालं. राजे, मामासाहेबांना

आणलंत, बरं झालं. नाही तर पोरीला पटलं नसतं. आत चलावं.’
सारे आत गेले. दादोजी हे कौतुकाने पाहत होते. राजे सामोरे गेले; आणि त्यांनी दादोजीचे पाय शिवले. ‘राजे। रोहिडेश्वराच्या पराक्रमापेक्षाही थोर पराक्रम आज केलात. समाधान दिलंत.’

पण हे समाधान फार काळ टिकणारे नव्हते. मुधोजीराव गेले, आणि थोड्याच दिवसांत विजापूरकरांची मुधोजीरावांवर इतराजी झाली. पुंडाव्याच्या आरोपाखाली आदिलशाही सरदार अंबरखान फलटणवर अचानक चालून आला. प्रतिकार करीत असता मुधोजीराव पडले. बजाजीला कैद करून विजापूरी नेले गेले. काही दिवस गेले; आणि हा धक्का सहन करीत असतानाच पुण्याला दुसरी बातमी येऊन थडकली- बजाजींना बळजबरीने मुसलमान केले. ज्याची बहीण शहाजीसारख्या सरदाराच्या मुलाला केली, तो सरदार बाटविल्याचा आनंद बादशहाला झाला. त्या आनंदात बादशहाने आपली मुलगी बजाजीला दिली.

राजे महालात गेले, तेव्हा सईबाई झोपल्या होत्या. मासाहेब शेजारी बसल्या होत्या. मासाहेब डोळे टिपीत महालाबाहेर गेल्या. राजे पलंगाजवळ गेले. सईबाई राजांच्याकडे पाहत होत्या. उठण्याचेही भान त्यांना नव्हते. चेहरा व्याकूळ झाला होता. ओठ थरथरत होते. बघता-बघता सईबाईंचे डोळे डबडबले; आणि सईबाईंनी मान वळविली. हुंदका फुटला. राजे पलंगावर बसले. सईबाईंच्या पाठीवरून ते हात फिरवीत होते. हुंदके वाढत होते. जरा वेळ गेला. राजांनी हळुवारपणे हाक मारली,

‘सई, जरा ऐकशील?’

कष्टाने सईबाईंनी डोळे टिपले. राजांनी सईबाईचा चेहरा आपल्याकडे वळविला. राजांचा आवाज घोगरा बनला होता.

‘सई, तू मनाला लावून घेऊ नको. बजाजी मुसलमान झाले, म्हणून काय झालं? ते आमचे आहेत. त्यांना आम्ही पारखे होऊ देणार नाही. ‘ते आता कसं शक्य आहे?’ सईबाईंनी विचारले.

नि:श्वास सोडून राजे म्हणाले, ‘हिंदू असलेले मुसलमान होऊ शकतात; मग मुसलमान हिंदू का होणार नाहीत? आज आमचे डोळे उघडले. आपलं माणूस परधर्मात जाणं किती भयंकर असतं, याचं दुःख आज कळलं. हजारोंनी या यातना भोगल्या असतील, हजारो भोगत असतील; पण आम्हांला त्याची जाणीव नव्हती. आम्ही तुम्हांला वचन देतो… बजाजी आमच्यांत आल्याखेरीज आम्हांला चैन पडणार नाही. सुखाचा घास आम्ही गिळणार नाही.’

सईबाई राजांच्या निश्चयी मुद्रेकडे पाहत होत्या. कृतज्ञतेने सारे अंग कंप पावत होते. काही न बोलता त्यांनी राजांच्या हातावर हात ठेवला. बराच
वेळ तो हात तसाच होता.

Leave a Comment