श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग ३
लखुजीरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लौकर उठू शकल्या नाहीत. रात्री, अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामानेडबडबून निघे. घरात चुकून भांड्यांचा आवाज झाला, तरी त्यांना कापरा सुटे. • सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले, तर डोळ्यांना पाझर सुटे, बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत.
एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या,
जिजाबाईंचे मन रमविण्याचे लक्ष्मीबाईंचे सारे प्रयत्न थकले. ‘राणीसाहेब, हे चालवलंय काय? जे झालं, त्याचं मला वाईट का वाटत नाही? साऱ्यांनाच त्याचं दुःख आहे. आपली काळजी वाटत नाही; पण त्या पोराची •वाटते. निदान पोटातल्या बाळाकडे तरी लक्ष द्या. या त्रासाचा परिणाम बाळावर
झाल्याखेरीज राहील का?’ जिजाबाईंचे सारे अंग भीतीने शहारून गेले. पितृवियोगाच्या आघातात त्या मुलाला विसरून गेल्या होत्या. जिजाबाई म्हणाल्या,
‘नका, लक्ष्मीबाई, असं बोलू नका. हे पाहा पुसले डोळे. पुन्हा मी रडायची नाही. माझं दुःख माझ्याबरोबर त्याचा भार दुसऱ्याला कशाला?”
‘खरं?” “अगदी शिवाईशपथ! तुम्ही म्हणाल, तशी वागेन मी. काळजी करू नका.’
‘सुटली!’
त्या दिवसापासून जिजाबाई परत वाड्यात वावरू लागल्या.
नऊ महिने संपले.
लक्ष्मीबाईना दिवसाला एक गोष्ट सुचत होती. विश्वासरावांनी देवाला अभिषेक चालू ठेवले होते. अनुष्ठानाला ब्राह्मण बसले होते. जाणत्या दासी जिजाऊच्या सेवेला
होत्या. अनुभवी, चांगल्या हातगुणाच्या सुइणी व निष्णात वैद्य गडावर हजर होते. बाळंतघरात चुना दिल्याने लखलखीत दिसणाऱ्या भिंतींवर स्वस्तिके काढली होती. छतावर मोत्यांच्या झालरी शोभत होत्या. खोली अंधारी भासू नये, म्हणून रौप्यसमया तेवत होत्या. ताज्या पाण्याचे सुवर्णकलश मंचकावर चकाकत होते. वास्तूला बाधा असू नये, म्हणून सर्वत्र पांढरी मोहरी फेकण्यात आली होती. उंची उदाचा वास आसमंतात दरवळत होता. नवीन जीवाची प्रतीक्षा करण्यात साऱ्या गडाचे जीव गुंतले होते.
दोन प्रहरचा सूर्य कलला होता. गार वाऱ्याची सुरुवात झाली होती. विश्वासराव, गोमाजी नाईक, वैद्यराज ही सर्व मंडळी सदरेत पान जमवीत बसली होती. पानाला
चुना लावीत नाईक विश्वासरावांना म्हणाले, ‘सरकार, आज बोलत नाही?”
‘काम बोलू, गोमाजीपंत? मासाहेबांनी मागे एकाची कडेलोटाची शिक्षा रद्द केली होती. आठवतं?’
“हो। मासाहेबांचं मन हळवंच आहे.’ “ते खरं, पण दिवसेदिवस हे प्रमाण वाढत आहे. तक्रारी येत आहेत. चालू वर्षी
जर पाऊस वेळेवर आला नाही, तर पुढचे वर्ष कठीणच दिसतं,’
‘मी बोलू?’ शास्त्रीबुवांनी विचारले.
‘बोला ना.’
‘मला पुढची वर्ष ठीक दिसत नाहीत. ग्रहांवरून स्पष्ट दुष्काळ दिसतो.’ ‘चांगलं सांगितलंत! ह्या असल्या भविष्यकथनापेक्षा राणीसाहेबांच्याबद्दल काही
चांगलं सांगा ना!”
‘त्याची काळजी सोडा. मी निश्चिंत आहे.’ शास्त्री म्हणाले. ‘आजच नाडी पाहिली. फार वेळ लागायचा नाही आता. कोणत्याही क्षणी…’ वैद्यांनी पुस्ती जोडली.
त्याच वेळी सदरेच्या पायऱ्या चढून दासी आली. अदबीने म्हणाली, ‘सरकार, राणीसाहेबांच्या पोटात दुखाया लागलंय्. म्हणून आईसाहेबांनी सांगावा सांगितलाय्.”
‘अंदाज चुकायचा नाही.’ वैद्यराज पुटपुटले. ‘मीही तेच म्हणत होतो.’ शाख्त्र्यांनी समाधानाचा निःश्वास टाकला.
सारे गडबडीने उठले. उठून काहीही उपयोग नाही, हे ध्यानी आल्यावर पुन्हा
सारे बसले.
वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. प्रहर उलटले. संध्याकाळ झाली. दिवेलागणीची वेळ आली, तरी काही वार्ता आली नाही. उलटणाऱ्या क्षणाबरोबर चिंता वाढत होती. दिसत होती, ती सुइणींची, दासींची धावपळ. नारोपंत तर देवीच्या मंदिराकडे केव्हाच गेले होते.
दिवेलागण झाली. रात्र वाढत होती. चिंताग्रस्त विश्वासराव सदरेत येरझाऱ्या घालीत होते. पलोते वाऱ्याने फरफरत होते. भिंतीवर सावल्या खेळत होत्या. काय बोलावे, हे कुणालाच समजत नव्हते.
-आणि दासी धावत आली. आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता. ती म्हणाली,
‘सरकार, मुलगा झाला!’ विश्वासरावांना आनंद लपविणे कठीण गेले. त्यांनी कमरेचा कसा काढून दासीच्या अंगावर भिरकावला. शास्त्रीबुवा घटका, पळे मोजीत पुत्रजन्माच्या वेळेची नोंद करण्यात गुंतले. विश्वासराव म्हणाले,
‘देवीची कृपा!’
विश्वासरावांना एकदम नारोपंत आठवले. त्यांना कळविण्यासाठी विश्वासरावांनी नोकर पाठवून दिला. समाधान होते. बाळ-बाळंतिणीला सुवासिनींनी कढत पाण्याने न्हाऊ घातले. वेदमूर्तींनी बाळाला आशीर्वाद दिले. स्वस्तिवाचन झाले. दासी-सुइणींच्या मुखांवर
अमाप मायेने आणि श्रद्धेने त्या जिजाबाईंना जपत होत्या.
शास्त्रीबुवांना घेऊन विश्वासराव जिजाबाईंच्याकडे गेले. बाळावरून सुवर्ण मोहरांचा सतका केला. जिजाऊंना विश्वासराव म्हणाले,
‘राणीसाहेब, शास्त्री आलेत.’
जिजाऊंनी झोपल्या जागेवरून कष्टाने नमस्कार केला.
शास्त्र्यांच्यासाठी मृगाजिन घातले होते. आशीर्वाद पुटपुटत शास्त्री आसनावर बसले. चांदीचा पाट समोर ठेवला गेला. दोन्ही बाजूंना समया प्रज्वलित करण्यात आल्या. शाख्यांनी पंचांग उघडले. बाळंतघराच्या दाराशी मुलाचे भाकीत ऐकायला सारे आतुरतेने गोळा झाले होते. शब्द श्रवणी पडू लागले 00
‘श्रीगणेशाय नमः । शुभं भवतु….
शास्त्रीबुवांनी बोटे मोजली. घटकापळांचे गणित मांडले. कुंडलीची घरे ग्रह भरू लागले. कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले. जिजाबाई म्हणाल्या,
‘शास्त्रीबुवा, संकोच न करता सारं स्पष्टपणे सांगा. या पोराच्या वेळी दिवस गेले, आणि घरादाराचा थारा उडाला. कुणाचा मेळ कुणाला राहिला नाही. रक्ताच्या नात्यांनी वैर पत्करलं. जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरला. आजोबांचं छत्र गमावलं. आज या मितीला या पोराचे वडील शत्रूमागे धावताहेत. याचा थोरला भाऊ लहान. त्याचीही या वणवणीतून सुटका नाही. साऱ्या मुलुखाची अन्नान्न दशा झालेली आहे… आणि परमुलुखात, परठिकाणी, ना माहेरी, ना सासरी आज मी याला जन्म देत आहे. पोटात असता ही तन्हा! आता याच्या पायगुणानं आणखी काय धिंडवडे निघणार आहेत, तेवढं सांगून टाका.”
ते ऐकून साऱ्यांची मने व्यथित झाली; पण शास्त्रीबुवांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हलली नाही. हसरा चेहरा गंभीर बनला नाही. ते त्याच स्मितवदनाने म्हणाले, ‘राणीसाहेब, असं अभद्र मनात आणू नका! अशुभाचा मनाला स्पर्शही होऊ देऊ
नका. दुर्भाग्य संपलं. भाग्य उजाडलं. प्रत्यक्ष सूर्य पोटी आला आहे.’
जिजाबाई खिन्नपणाने हसल्या. त्या म्हणाल्या, ‘मुलाची कुंडली मांडताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो.’
शास्त्री गंभीर झाले. ते निश्चल, खणखणीत आवाजात बोलते झाले,
‘राणीसाहेब, अविश्वास धरू नका. आजवर या शाख्याचं भाकीत खोटं ठरलं नाही. द्रव्यलोभानं नव्हे, पण ज्ञानाच्या अनुभवानं, आत्मविश्वासानं मी हे भाकीत केलं आहे. ते कालत्रयी चुकणार नाही. हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग फेडील. राणीसाहेब, पापाचा भार वाढला असता, धरित्री त्रस्त झाली असता, देवकी-वसुदेव
कंसाच्या बंदिशाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला, हे कृपा करून विसरू नका.’ “आपल्या तोंडात साखर पडो!’ जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली. मुठी चोखीत ते शांतपणे झोपी गेले होते.
६ जिजाबाई प्रसूत झाल्यापासून गडावर नवे वारे संचारले होते. शहाजीराजांना हे शुभ वर्तमान कळविण्याकरिता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता. देवधर्म, पूजाअर्चा, अभिषेक यांची गडावर गर्दी उसळली होती. पाचव्या दिवशी बाळंतघरात शस्त्रपूजा केली गेली. नांगरही पुजला गेला. पाचव्या, सहाव्या आणि आठव्या दिवशी अशाच पूजा झाल्या.
लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोरात करीत होत्या. तातडीने घडविलेले नवीन दागिने, नवी वस्त्रे गडावर आणली जात होती. अंजिरी जरीबुट्टी शालूची घडी उघडीत लक्ष्मीबाई म्हणाल्या,
‘राणीसाहेब, हा रंग चांगला आहे, नाही?’
‘हो.’
‘बारशाला हाच ठरवू.’
‘लक्ष्मीबाई!’ जिजाबाईंचा कंठ दाटला. ‘किती करताय् तुम्ही!’ ‘पण आम्ही परके, ते परकेच!’ लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या.
‘मी केव्हा म्हटलं परकं ?’
‘तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरले. बाळाचं भविष्य वर्तवायला शास्त्री आले, तर चारचौघांत म्हणालात… ना माहेरी… ना सासरी…’ ‘ते मनावर घेऊ नका, बाई! सख्ख्या बहिणीनं सुद्धा एवढं केलं नसतं; पण
अजूनही वाटतं…’
‘काय?’
‘बारशाच्या वेळी याच्या घरचं कोणी तरी हवं होतं.’
‘सांगा ना सरळ की, राजेसाहेब यायला हवेत, म्हणून.’
जिजाबाई लाजल्या.
दुसऱ्या दिवशी गडावर एक शाही मेणा येत असल्याची वर्दी आली. विश्वासराव
सामोरे गेले. येताना वर्दी घेऊन आले : शहाजीराजांच्या मातोश्री, जिजाबाईच्या सासूबाई उमाबाईसाहेब गडावर येत आहेत.
मुजरा वाड्याच्या दरवाज्याशी साठीच्या उमाबाई उतरल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वाड्यात उमाबाईनी प्रवेश केला. विश्वासरावांनी केला. बाळंतघराच्या आत येताच जिजाबाई पाया पडल्या. लक्ष्मीबाईनीही वंदन केले. उमाबाई म्हणाल्या,
‘बेटा, बाज सोडून कशाला आलीस? मी नसते का आले?’ बाळ पाळण्यात झोपला होता. बारक्या नजरेने बाळाला निरखीत, त्यावरून
सतका करीत उमाबाई म्हणाल्या, “तुझ्याच वळणावर गेलाय, हो! बारसं केव्हा?”
लक्ष्मीबाई म्हणाल्या, ‘उद्याच! कालच राणीसाहेब म्हणत होत्या, की बाळाच्या
घरचं कुणी तरी हवं, म्हणून.”
‘वाटणारच पोरीला…. जिऊ, चांगला आहे, हो, मुलगा. मनात आणशील, ते पुरं करणार, असं दिसतंय्…’ आणि एकदम गंभीर होऊन उमाबाई म्हणाल्या, ‘आणि याच्या बापाला कळवलं का?”
‘हो.’
‘कुठला येतोय् तो. घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजीत फिरणार तो! जळलं
ते राजेपण!”
दोघी हसून उमाबाईंचे ऐकत होत्या.
थोडा वेळ गेला, आणि उमाबाईंनी विचारले, ‘केव्हा उठणार, ग, हा?’
जिजाबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या म्हणाल्या, ‘सासूबाई! घ्या ना. उठला, म्हणून काय झालं? पुन्हा मांडीवर झोपेल.’ ‘नको, ग. मी थांबेन. झोपमोड कशाला? आणि थोरला कुठं आहे, ग?’ ‘स्वारीबरोबरच…’
‘तो एक गाढव, आणि लहान पोराला पाठवणारी तू सात गाढव! अशी पोराची वणवण करतात का? मी असते, तर सांगितलं असतं…’ निःश्वास सोडून त्या म्हणाल्या, ‘पण माझं तरी कुठं ऐकतोय तो?”
उमाबाई बारीकसारीक गोष्टींचा तपास करीत होत्या. उत्तरे द्यायची दोघींना सुचत नव्हती. तेवढ्यात बाळाचे रडणे कानांवर आले. उमाबाई गडबडीने उठल्या. त्यांनी बाळाला उचलले. पटापट मुके घेतले. मांडीवर घेऊन त्या बाळाला उगी करू लागल्या; आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाऊंनी बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले.
पहाटे गड जागा झाला, तो सनई-चौघड्यांच्या आवाजाने. वाड्याच्या दारावर तोरणे बांधली होती. दासींनी सडा शिंपून रांगोळ्या भरल्या. पाकगृहासाठी गंगा जमुना टाक्यांचे पाणी उपसले जाऊ लागले.
बाळाची जरी कुंची, दागिने, कपडे पाहून उमाबाईंनी पसंतीची मान डोलविली. शाख्यांना बोलावून दिवसाची परत खात्री करून घेतली. सूर्योदयापासून गडावर माणसांची वर्दळ सुरू झाली. जुन्नर गावच्या प्रतिष्ठित घरांतील स्त्रिया डोलीमेण्यांनी गड चढत होत्या. गोरगरीब अन्नाच्या आशेने वर येत होते. उमाबाई सारे कौतुकाने पाहत होत्या.
साऱ्यांची जेवणे झाली. साऱ्याजणी पाळणा सजवू लागल्या; बाळाला सजवू लागल्या. गाण्याचे सूर उठू लागले. बारशाची वेळ झाली. जिजाऊंनी उमाबाईंना हळूच विचारले,
“बाळाचं नाव काय ठेवायचं?”
‘तू काय ठरवलंस?’
‘शिवाईला नवस बोलले होते. ‘शिवाजी’ ठेवू या.’
‘ठेव! चांगलं आहे.’
सुवासिनींनी बाळाला, जिजाबाईंना ओवाळले. बाळाला लक्ष्मीबाईनी हातांवर घेतला. ‘गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या, ‘ झाले. जिजाऊ पाळण्यात वाकल्या. त्या बाळाच्या कानाशी म्हणाल्या,
‘शिवाजी.’
जिजाऊच्या पाठीवर गोड बुक्क्यांचा वर्षाव झाला. तुताऱ्या-चौघड्यांच्या नादात
सारा गड भरून गेला. बाळाचे नाव ‘शिवाजी’ ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झाले. वाड्याबाहेर मेणा तयार होता. बाल शिवाजी देवीदर्शनासाठी निघाला. जिजाबाई बाळाला घेऊन मेण्यात बसल्या. लक्ष्मीबाई मेण्याबरोबर दासीपरिवारासह चालत होत्या. विश्वासराव, शास्त्री, वैद्यराज, नारोपंत, गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती. त्यांच्या पुढे मंगल वाद्ये वाजत होती.
देवीसमोर बाळाला ठेवण्यात आले. देवीचा अंगारा बाळाला लावला होता.. भटजींनी आशीर्वाद दिले. विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करीत होते. त्याच वेळी जिजाबाईंनी एक मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला. नकळत विश्वासरावांनी विचारले,
‘काय हे?’
जिजाबाईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या,
‘आबा गड सोडताना नवस बोलले होते. मुलगा झाला, तर त्यांनी देवीवरून शंभर मोहरा उतरून टाकण्यासाठी दिल्या होत्या. नवस बोलणारा निघून गेला;
नवस तेवढा मागं राहायला नको.’
जिजाबाईनी पुढे बोलवेना. त्यांनी डोळ्यांना पदर लावला. थरथरत्या हातांनी विश्वासरावांनी कसा उघडला. मुठींनी मोहरा भरून घेऊन ते
देवीवरून ओवाळून टाकीत होते. बाल शिवाजीच्या उशापायथ्याशी सुवर्णाचा सडा पडत होता.