छत्रपती शिवाजी महाराज मी कोण आहे ? shivaji maharaj
मी कोण आहे ?
●मी तोच मदारी मेहतर आहे ज्याने जीव धोक्यात घालून शिवारायांची आग्रा हुन सुटका केली.
●मि तोच स्वराज्याचा आरमार प्रमुख दौलत खान आहे, ज्याने शिव राज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकवला.
●मि तोच सिद्दी हीलाल आहे, ज्याने पन्हाळ्या हुन शिवरायांची सुटका करताना आपल्या मुलाचे सिद्दी वाहवाह चे बलीदान दीले…
●मि तोच नुर खान बेग आहे ज्याने सरनौबत म्हणून स्वारज्याची धुरा सांभाळलि.



●मि तोच शिवरायांचा अंग रक्षक सिद्दी इब्राहीम आहे ,ज्याने प्राण पणाने आयुष्यभर शिवरायांचे संरक्षण केले.
●मि तोच तोफखाना प्रमुख इब्राहीम खान आहे ज्याच्या हातात शिवरायांनी स्वराज्याची तोफ दिली होती.
●मि तोच *रूस्तुमे जमाल आहे ,ज्याने शिवरायांना वाघ नख्या बनवून दिल्या होत्या ….
●मी तोच मावळा आहे ज्याने
नेहमी स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी आपला जीव दिला.
● मी तोच वीर बाजी पासलकर आहे
ज्यानी स्वराज्याच्या पहिल्या लढाईत आपले *प्राण अर्पले.
● मी तोच कान्होजी नाईक जेधे आहे
ज्यानी अफजलखान वधाच्या वेळी राजांची बाजु घेतली आणी १२ मावळची वज्रमुठ एकत्र करुन लढा दिला आणि जिंकला…
● मी तोच रायाजी नाईक बांदल आहे
ज्यानी केवळ ६०० शिबंदीवर
पन्हाळ्याच्या वेढा भेदुन
विशाळगडावर शिवरायांना सुखरुप पोहचवले
● मी तोच येसाजी कंक
राजांचा बालपणीचा मित्र,
राजाचा मान ठेवायला जीवाची पर्वा न करता थेट ऐरावताला जो अंकुशा सारखा जाऊन
भिडला आणी गर्दिस आणले.
● मी तोच तान्हाजी आहे राजांच्या बालपणीचा सवंगडी जो
कार्यतत्पर होऊनी आपल्या मुलाचं लग्न टाकुन कोंढान्याच लग्न करायला निघाला.
पण परत आलाच नाही
किती लोक आहेत जे घरचं काम टाकुन
समाजाचं काम करतात?






● मी तोच शेलारमामा आहे
८० वर्षाचा असुन सुद्धा तरुणा सारखा दोर धरुन जो कडा चढला
● मी तोच सुर्याजी आहे
तान्हाजी नावाच्या सिंहाचा भाऊ…
तो सिंह पडला तरिही जो खचला नाही… करेल किंवा मरेल म्हणुन सिंहगड जिंकला ज्याने…
●मी तोच स्वराज्याचा सरनौबत नेताजी पालकर आहे
ज्याने आपलं पुर्ण आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण केलं.
जो उभ आयुष्य
स्वराज्यासाठी झटला…
स्वताच्या जीवाची तर कधीच
पर्वा नाही केली.
●मी तोच कडतोजी आहे
जो आपल्या प्रतापाने प्रतापराव
झाला. जो मनापासनं राजांवर प्रेम करायचा.
स्वराज्यासाठी क्षणाचाही विचार न करता जो मृत्युस सामोरे गेला…
●आणी मी तोच हिरोजी इंदलकर आहे.
आपली जमीन, वाडे
विकुन राजधानी बांधुन काढनारा.
मी तोच
हिरोजी जो राजांच्या पायाची पायधुळ जरी मस्तकावर
पडली तरिही आयुष्य धन्य झालं हे समजणारा…
● मी तोच हंबीरराव आहे
ज्याने नात्या समोर
कर्तव्याला आणी स्वराज्य निष्ठेला मोठ समजलं.
आणी शेवट पर्यंत आपल्या धन्याची साथ नाही सोडली…
मी तोच ज्याने हंबिरपणे
आतल्या आणी बाहेरच्या दोन्ही शत्रु पासुन स्वराज्य वाचविलं
●मी तोच
स्वराज्याचा भार संभाळनारे दोन पैलु,
औरंग्याची झोप उडविनारे,
संताजी आणी धनाजी धाकल्या धन्याच्या मृत्यु नंतर जमिनीचा एक
तुकडा सुद्धा औरंग्याच्या हाती ज्यांनी लागु
नाही दिला…
● मी तोच महादजी शिंदे आहे
ज्यानी दिल्ली स्वराज्याच्या अधिपत्या
खाली आणली आणि
शिवरायांचे स्वप्न पुर्ण केले
● मी तोच दर्या सारंग आहे
ज्याने तोफांच्या मारात किल्ला बांधुन काढला आणी स्वराज्याचा धाक समुद्रावर
बसविला…
● मी तोच जीवाजी महाले आहे
ज्याने शिवाजींसाठी स्वत:च्या
जीवाची पर्वा न करता गनिमाला ठार केले…
● मी तोच शिवा काशिद आहे
जो राजांना वाचवायला हसत हसत मृत्यु समोर गेला. फक्त मातीत नाही मेला तर
माती साठी मेला…
● मी तोच बहिर्जी नाईक आहे.
शिवराजच्या रौद्ररूपाचा तीसरा डोळा, गरूडाची नजर,
गनिमांच्या हालचालींवर सदा तत्पर…
● मी तोच जावळीतला मुरारबाजी आहे.
गडाचा दरवाजा उघडुन नंग्या तलवारी नाचवनारा.
शत्रुवर मृत्यु म्हणुन जो गारजला.
वेळ प्रसंगी जीव दिला पण बेईमानी नाही केली…
● मी तोच हिरोजी फरजंद
राजा सुखरूप निसटे पर्यंत यमाच्या दरबारात
आपल्या जीवाची पर्वा न करता राहिला…
● मी तोच समशेरीचा फर्जंद आहे कोंडाजी फर्जंद ६० मावळे घेऊन ज्याने पन्हाळा जिंकला. थेट जंजिऱ्याला धडक दिली. तोफेच्या तोंडी गेला पण स्वाभिमानाने मेला.
● मी तोच सिद्दी हिलाल आहे
जो ‘वेडात वीर’ मरण
पावला.
जो वाऱ्या सारखा आला आणी तीरासारखा गनिम कापुन
गेला…
● मी तोच मावळा आहे
जो आजही एक वेळा नाही तर
हजार वेळा राजांसाठी मरायला तयार आहे
आणि राजांसाठीच जगायला सुद्धा.






★ मी तोच
॥ स्वराज्य सेवेस ठाई तत्पर ॥
शिवराय होण शक्य नाही तरी
वीर बाजीं सारखी पवित्र संमिधा’ बना
कान्होजीं सारखी ‘वज्रमुठ’ बना
रायाजीं सारखी ‘भेदकता’ बना
येसाजीं सारखा ‘अंकुश’ बना
तान्हाजीं सारख ‘कार्यतत्पर’ बना
परिक्षेच्या क्षणी ‘हंबीरराव’ बना
अवघड क्षणी ‘नेताजी’ बना.
प्रत्येक वेळी ‘प्रतापराव’ बना
अंधार दूर करणारा ‘सुर्यराव’ बना
बेईमानी न करणारा ‘मुरारबाजी’ बना
स्वप्नपुर्ती करणारा ‘महादजी’ बना
मी कोण आहे
मी”शिवछत्रपतींचा मावळा” आहे.
मी “स्वराज्यनिष्ठ” आहे.
मी “त्याग” आहे
मी “पराक्रम” आहे
मी “शौर्य” आहे
मी “स्वराज्याचा विचार” आहे..
मी ‘अमर’ आहे
कारण माणसं मरतात
“विचार कधीच मरत नाही…”
चला छत्रपती शिवरायांच्या
विचारांचा व स्वप्नातला महाराष्ट्र घडवूया।
कुळवाड़ीभूषण बहुजन प्रतिपालक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तमाम बहुजन रयतेस कोटी कोटी शुभेच्छा…!
शिवजयंती चिरायु होवो…!
जय जिजाऊ
जय शिवराय










2 thoughts on “shivaji maharaj छत्रपती शिवाजी महाराज मी कोण आहे ?”