Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवराय एक माणुसही होते
नानाभाऊ माळी
आज छत्रपती शिवरायांचीं तिथीनुसार जयंती आहे!जयंती सतत शौर्याचीं याद करून देत असतें!हृदयात छत्रपती राजांचं नाव कोरले जाऊन पृथ्वी अंतापर्यंत भावी पिढी कधीही विसरणार नाही असा इतिहास घडविणाऱ्या महान राजांची आज जयंती!आज सोमवार!शिवाचा सोमवार आहे!आज चतुर्थी आहे!तीन पावित्र्याचां संगम आज होत आहे!!आज राजांना कोटी कोटी मानाचा मुजरा करीत असतांना त्यांचा जन्म आठवून पाहावासा वाटतो!चौफेर यवनी राजवटीचा सुळसुळाट, अत्याचार सुरू होता!राजामाता जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर सुरक्षित ठेवले होते!शहाजी राजे रयतेची काळजी घेत होते!दुःख हेचं होते की परकीय यवनी सत्तेचा राजकारभार पाहावा लागतं होता!यांचा परिणाम राजमातांवर आधीपासूनच झाला होता!शिवनेरीवर जन्म घेणाऱ्या बाल शिवरायांना सत्य कथन करीत स्वतःचं राज्य का असू नये? असा असा सवाल करून बाल शिवरायांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे बीज रोवले होते!बालमनावर जाज्वल्य संस्कृती प्रेम घडविणाऱ्या राजमाता बाल शिवरायांना दूरदृष्टी देत होत्या!
जिंकण्यासाठीचं लढाई लढायची!निश्चय मनी ठेवून!त्यागर्पण करून बाल शिवरायांनी पहिले शिवतोरण तोरणा किल्ल्यावर बांधले होते!तेथूनचं स्वतंत्र राज्याची घोडदौड सुरू झाली होती!संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे एकमेव राजे होते!जन्मापासून तें निरोपापर्यंत अखंड झुंज सुरूचं होती!त्याग सुरू होता!अनेक जिवलगांचे बलिदान पाहून कधी दुःखी व्हायचे!कधी गड जिंकल्यावर आनंदही व्हायचा!हा संघर्ष थांबला नव्हता!हिंदवी स्वराज्याचा भगवा रायगडावर फडकत होता!३५० किल्ल्यांचे अधिस्वामी,रयतेला न्याय देणारा हिंदवी स्वराज्य रक्षक राजा लढत होता!महाराजाधिराज आयुष्यभर शौर्य गाजवीत होते!छत्रपती राजा होते पण राजाही माणूस असतो!त्यांचं आंतरिक काळजाचं सुख दुःख होतं!जीवन समर्पण हेचं त्यांचं ध्येय होतं!आज दिमाखात शिवरायांची जयंती साजरी होत आहे!
सुख, दुःख अनुभवीतं!आयुष्य शत्रूशी लढण्यात घालवीणारें छत्रपती शिवाजी राजे कुटनीतिज्ञ राजा होते!महापराक्रमी राजा होते!महान योद्धा होते!चातुर्य पणाला लावून लढाई लढणारे राजा होते!शत्रूच्या कपट नितीला त्यांच्याचं शब्दात उत्तर देणारे शूरवीर राजा होते!रणधुरंदर राजा होते!…. तरीही तें एक माणूस होते!

संघर्ष, झुंज राजांचा स्वभावचं होता!अनेक काटकरस्थान उधळून लावणारे बुद्धिमान राजा छत्रपती शिवाजी राजे होते!तरीही त्यांचा महापराक्रम इतिहास कधीही पुसू शकणार नाही!अल्प आयुष्यात, अवघ्या ४९ व्या वर्षापर्यंत सेनापती, अष्टप्रधान मंडळ,रयतेचा राजा, क्षत्रिय कुलावंतसं अशी महिमा निर्माण करणाऱ्या राजास विश्रांतीला वेळ मिळालाच नसावा हो!सत्ताकारण, युद्धकारण, रयतेशी घट्ट नाळ असणारें मराठा हिंदवी भगवा अखंड फडकविणारें छत्रपती एक माणुसही होते हो!अनेक दुःख पचवीत उभे होते!सुख हृदयात ठेवीत उभे होते!राजाही एक माणूसचं असतो नां!!!!त्यांना शांत झोप कधी मिळाली असेल का?…. शेवटी राजा देखील माणूसचं असतो हे कोणी जाणलं होतं का?सिंहासनाधिश्वर म्हणून राज्य करतांना त्यांनी व्यक्तिगत सुख कधी अनुभवलंच नसेल हो!प्रजेसाठी राजा असतो हेचं त्यांनी सिद्ध केलं असावं!शरीर अन मन तंदुरुस्तीसाठी त्यांना वेळ मिळाला असेल का हो ? रयतेंसाठी अखंड आयुष्य घालवणाऱ्या राजास सुखाचे क्षण भेटले असतील का? का सतत लढाया, संघर्ष, झुंज यातून अखंड आयुष्य सरकत राहिले असेल!शेवटी राजाही एक माणूसचं असतो नां!!!!
अश्रूनीं भिजतांना भावना,
त्यांचं काळीज तळमळत होतं !
कोसळलेलं दुःख सहत,
त्यांचं हृदय कळवळतं होतं !
वेदना तळमळूनि उठतांना
वाफाळुनी डोळ्यातं शिरली होती
पापणी कड्यांनां झाकूनि
त्यांच्या अश्रुंची नदी भरली होती!
राजवैभवी सुख अनुभतांना
सतत काट्यावर मुकुट होता
जरी लढूनी जिंकतं जात राहिले
का राजवैभव काथ्याकुट होता?
शिवनेरीचा राजपुत्र शिवबा
ठेऊनि गेलेंतं हो खाणाखुणा
राज्य करुनी रायगडावरी
आमुचे राजे यावेत पुन्हापुन्हा!
कधी त्यांच्या अफाट शौर्याने काळीज फुलंत तर कधी दुःखाने कडा पाणावतात!दुःखावेगाचा लोंढा डोळ्यांचा भक्कम बांध फोडून बेकाबू होऊ लागतो!भावनेचां लोंढा सावरणे,कठीण होऊन जातं!डोळ्यात थांबलेले ढग हलके होऊ लागतात!भावनेचा निचरा अश्रूधार होतें!पुढे अश्रूधार अश्रुंचा पूर होतो!पुराचं रूपांतर महापुरात होत असतं!माणूस अश्रू गाळतो!माणसं अश्रू गाळू लागतात!जनसागर अश्रू गाळतो!कधी दुःखद वार्ता महाराजांच्या कानी जाते!छत्रपतीं महाराजांना अनावर दुःख होतं!त्यांच्याही डोळ्यात अश्रुंचा सागर गच्च भरतो!दुःख आवेग प्रचंड असतो!डोळ्यात अश्रू तरळू लागतात!हजारोनां भारी पडणाऱ्या वीर योद्धयासं वीरमरण आलेलं असतं!काही क्षण भावनिक होऊन राजे तळमळू लागतात!भलभळून दुःख वाहू लागतं!पण राजमुकुट डोक्यावर होता!संयम हिचं शिकवण घेतलेल्या राजांनी दुःख आवरत कर्तव्य पालणास प्राधान्य दिले होते!अहो राजाही एक माणूसचं होते नां!!!!!
पण….पण कर्तव्यापोटी संयमीत होऊन स्वतःच दुःख ओढून बाजूला ठेवत!राजे मावळ्यांचे, प्रजेचे इतरांचे अश्रू पुसू लागतात!स्वतःला दुःख झालेलं असतांना किती दुःख सहन करावं?छत्रपती महाराजांनां जीवास जीव देणारा वीर योद्धा दिसतं असतो!शेवटी राजाही एक माणूसचं असतो हो!प्रेम, त्याग, हळवेपण पाषाणी पिंजऱ्यात,हृदयातं जपून ठेवलेलं असतं!एकांतात घळाघळा अश्रू गाळून,रडून घेत पुन्हा छातीवर संयमी दगड ठेवीत प्रजेच दुःख हलके करणारा राजा छत्रपती शिवराय होते!तें दैवी अवतार होते!
डोळ्यात डबडब अश्रू तरळत असतांना!दुःख झालेलं असतांना!कर्तव्याची प्रचंड मोठी जाणीव खुणावू लागते!रयतहित काळजात येऊन उभी रहाते!हृदयाची कोमलता हळूहळू कठोर होत जाते!स्वराज्यहित जबाबदारी देऊ लागतं!तेथे लढवंय्या सह्याद्री राजा दिसू लागतो!छत्रपतींचा एक एक मावळा lस्वराज्यासाठी लढणारा महापराक्रमी योद्धा शौर्यानें लढतांना युद्धभूमीवर वीरश्री खेचून आणताना,वीरगतीला प्राप्त झालेला असतांना,दुःखावेग आवरीत देश,धर्म अन प्रजेसाठी शिवरायांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात ,’गड आला पण सिंह गेला!’राजा केवळ राजा नव्हते!स्वतःचं दुःख सहन करीत रयतेचे दुःख हलके करणारे छत्रपती शिवाजी राजा माणुसही होते!
दुःख खूप खूप मोठं होतं!जबाबदारी खूप मोठी होती!रयेतचं हित अन कर्तव्य त्याहून विशाल होतं!दूरवरून राक्षसी जुलमी क्रूरता कानी पडत होती!दिसतं होती!शत्रूला नामोहरम करायचं होतं!गारद करायचं होतं!मोजक्याच मावळ्यांच्या साथीने लढाई जिंकायची होती!दुःख आवरून क्रूर शक्तीच्या निप्पातासाठी पुढे सरसावत रयतेचं राज्य वाढवीत होते!रयतेच्या मनात सुरक्षिततेची निर्माण करायची होती!शत्रूशी लढत रयतेवर प्रेम करायचं होतं!राजांच्या
डोळ्यांच्या ओलसर कड्यांवर भगवा फडकत होता!पापणी कड्यांवर अश्रू थोपवत होते!शूर विरांना काळजातल्या भक्कम खोल कप्प्यात ठेवून सह्याद्रीच्या कडेकपारी शत्रूचा सामना करीत हिंदवी स्वराज्य विस्तारित होते!!एवढा संघर्ष, युद्ध, तलवारी, लढाईतून रात्रंदिवस जागतांना राजाही एक माणुस होते!!!
सह्याद्रीच्या शूर,मर्द, लढवंय्या मराठ्यांच्या हाती तलवार अन तोफा द्यायच्या होत्या!भाला, तलवारी, ढाली तळपत होत्या!शत्रूला तलवारीवर घेऊन पाडावं करीत राहिले!सेना लढत होती!अथक लढत होती!महाराजांच्या भाग्यात सुख,आनंदाचें अनमोल क्षण तरी भाग्यात होते का?महाराष्ट्र भूमी राखायची होती!देवी माता भवानीनें दिलेल्या तलवारीतून हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं!समोर चालून आलेल्या अक्राळ विक्रांळ राक्षसशी,यवणी शत्रूचा निप्पात करीत छत्रपती शिवराय मावळ्यांना घेऊन दऱ्याखोऱ्यात निघाले होते!अटकेपार भगवा फडकत होता!त्यांचा शिवजन्म रयतेसाठीच होता!आता मागे फिरणं नव्हतं!थांबणं नव्हतं!शत्रूस नामोहरण करायचं होतं!शिवनेरीतून राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्म घेणारा राजा राजगडावरून रायरेश्वराच्या दिशेने निघाले होते!कमी आयुष्यात,अवघ्या ४९ व्या वर्षांपर्यंत रायगड अत्यंत भव्यदिव्य सजला होता!शेवटी राजांचं व्यक्तिगत सुख दुःखही होतं!राजाही माणूसचं होता नां!!!!!
छत्रपतींच्या नावाभोवती दिग्विजय शब्द होता!शिवाजी नावात शौर्याचा प्रारंभ होता!तें रयतेचा श्वास होते!तरीही राजा ही एक माणुसचं असतो ना!!!!त्यांनाही व्यक्तगत आयुष्य होतेचं!संवेदना होत्या!भावभावना होत्या!विश्वासू सहकारी बलिदान देत स्वराज्यासाठी रक्ताभिषेक करीत होतें!विश्वासू सहकाऱ्यांच्या बलिदानातून स्वराज्य उभं होतं!मावळ्यांच्या पराक्रमातून स्वराज्य उभं होतं!तरीही राजाही माणूसचं असतो नां?त्यांनाही काळजातून भावना होत्याचं! स्वराज्यासाठी लढतांना शूर मावळ्यांचं बलिदानाचं दुःख अंतःकरणातून पचवत रयतेचा राजा धिरोदात्तपणे उभा होता!दुःखी क्षण राजांच्या उरात होते!अहो राजाही माणूस असतोचं नां!त्यांचं दुःख कुणाला सांगणार होते?हृदयातले शूरवीर योद्धे कामी येत असतांना प्रत्येक प्रसंगी महतप्रयासाने दुःख गिळून राजधर्म,देशकर्तव्य अन रयेतेच्या स्वप्नातील राज्य साकार करणारे सिंहछाती छत्रपतीचें दुःख एकांतात अश्रूपूर बनून वहात होते!शेवटी राजेंही एक माणूस होते नां?
छत्रपती शिवरायांचें मावळे शब्द प्रमाण मानून लढत होते!अक्राळविक्राळं अस्मानी तुफानाशी लढत होते!संख्येने कमी असूनही शत्रूचा नाश करीत होते!प्रत्येक मावळा राजांसाठी लढत होता!स्वभूमीसाठी लढत होता!हिंदवी स्वराज्यासाठी लढत होता!तळ हातावर प्राण घेऊन लढत होता!छातीची ढाल बनून लढत होता!राजांसाठी बलिदानास तयार होता!काळजातून राजनिष्ठा होतीं!राजांसाठी प्राण अर्पण करीत होता! जिंकण्यासाठीचं लढत होता!रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत होता!मायभूमीसाठी लढत होता! ‘छत्रपती शिवाजी राजांसाठी’ लढत होता!मावळे गुरील्ला युद्धनीतीने लढत होते!जिंकत होते!
कुठले संस्कार होते राजांवर? रयतेवर कोणती मोहिणी होती राजांची?कसली जादू होती राजांची?होय, राजमाता जिजाऊंचे सुसंस्कार होते राजांवर!भारतीय संस्कृती राखायची होती राजांना!परचक्राचा नाश करण्यासाठीचं जिजाऊंचां सिंह जन्माला आला होता!कित्येक शतकांची गुलमगिरी नष्ट करण्यासाठीचं शिवरायांचा जन्म झाला होता!पुन्हा ‘यदा यदाही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत!’…. घडत होतं!दुष्टचक्राचा निप्पात करण्यासाठी शिवजन्म झाला होता!अस्मानी सुलतानीचा सामना करण्यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवबांना घडविले होते!नेतृत्वगुण कर्तृत्वाकडे वाटचाल करीत होते!कर्तृत्वातून स्वराज्य स्थापिले होते!बालपणापासून दिव्य कार्याच शब्दवचन देणारे राजे दिग्विजयी राहिले!कमी आयुष्यात पृथ्वी अंतापर्यंतचं विश्वकार्य करून निघून गेलेत!छत्रपती दिगविजयी होते!कित्येक वेळा हानी देखील झाली होती!सतत युद्धाचा प्रसंग सामोरी उभा होता!शिवराज्याभिषेक झाल्यावर शत्रुंची मोठी फळी समोर उभी होती!कुशल नेतृत्वगुणांनी रयतेच्या हृदयात राज्य करणारा एकमेव विश्व प्रसिद्ध राजा भारतात छत्रपतींच्या रूपाने जन्माला आला होता!भारतीय संस्कृतीलां गौरवास्पद होतं!आम्हा महाराष्ट्रीयांना अभिमान आहे!अशा विश्वविजयी छत्रपती शिवाजी राजांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!मानाचा मुजरा!
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१७ मार्च २०२५