श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग ३

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग ३ लखुजीरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लौकर उठू शकल्या नाहीत. रात्री, अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामानेडबडबून निघे. घरात चुकून भांड्यांचा आवाज झाला, तरी त्यांना कापरा सुटे. • सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले, तर डोळ्यांना पाझर सुटे, बोलणाऱ्याला शब्द सुचत … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 2

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग-2 सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव नीळकंठ, रघुनाथ बल्लाळ, कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाज्याशी उभी होती. एक शाही मेणा पहिल्या चौकात ठेवला होता. भोईपट बांधलेले भोई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते. विश्वासरावांची मंडळी आत जिजाऊंची खणानारळाने ओटी भरत … Read more

शिवरायांचे बालपण व जन्म

शिवरायांचे बालपण माहिती

शिवरायांचे बालपण व जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी सूर्यास्त समयी किल्ले शिवनेरीवर झाला. आईचे नाव जिजामाता तर पित्याचे नाव शहाजीराजे भोसले होते. राजकारण व लढायांच्या धामधुमीत शहाजीराजांनी गर्भवती जिजाऊस सुरक्षिततेच्या दृष्टीने बाळंतपणासाठी नोव्हेंबर १६२९ दरम्यान शिवनेरीवर ठेवले होते. शिवनेरी त्या काळात निजामशाहीत होता. शहाजीराजेंचे थोरले सुपुत्र संभाजी यांचे सासरे विजयराव श्रीनिवासराव … Read more

शिवरायांचे पूर्वज कुळवाडी भूषण

शिवाजी महाराज फोटो

शिवरायांचे पूर्वज कुळवाडी भूषण भाग एक भोसले कुळात सन १५३० मध्ये बाबाजी भोसले यांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीचे नाव रेवावू होते. त्यांना सन १५५० मध्ये मालोजी तर सन १५५३ मध्ये विठोजी नावाचे पुत्र झाले. मालोजींच्या पत्नींचे नांव उमाबाई व दीपाबाई होते. दीपाबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. वनगोजी नाईक निंबाळकर हे त्या काळातील नावाजलेले व्यक्ती होते. … Read more

मराठा ते मराठेशाही कुळवाडी भूषण

Maratha Empire

मराठा ते मराठेशाही कुळवाडी भूषण Maratha Empire मराठा साम्राज्य मराठेशाही प्राकृतातील शब्द मरहट्टी, मरहट्टा, महारट्टा पुढे संस्कृतात मराठी, मराठा, महाराष्ट्र झाले असावेत, असा अनेक संशोधक अभ्यासकांचा दावा आहे; परंतु मराठा कोण? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. भारताचा प्राचीन इतिहास प्रामुख्याने वायव्य, उत्तर गंगा-यमुना खोरे ते पुढे ईशान्यकडे पसरलेल्या प्रदेशाशीच संबंधित लिहिला गेला आहे. नर्मदा वा … Read more